(अ)प्रिय अतिरेक्यांनो………… ……… …
मारून मारून मारल किती ?
हा १२५ कोटि चा देश आहे
तावुन-सुलाखून निघालो आम्ही
एकात्मता अजूनही शेष आहे
जिंक्ल्याची नशा चढेल ,
हा क्षण चा भास् आहे
१५० वर्षाचा लड़न्याचा
पाठीशी आमच्या इतिहास आहे
लपून-छापून लढता तुम्ही
औलाद तर भित्रयांची आहे
दिसली जी झलक आम्हाला
ती पागल कुत्र्याची आहे
कधी हिरवा,कधी भगवा
ही तुमची धार्मिक ढाल असते
वाहिले जाते जे रक्त सरे
ते तर फ़क्त लाल असते
तसे तुमचे नापाक इरादे ही
कधी पूर्ण होऊ शकत नाहीत
तिरंग्याची शपत आहे ,
आम्ही उगाचच बकत नाहीत
नाक उचलून बोलतो आम्ही
तुमच्या प्रमाने नकटे नाहीत
राहिल जग पाठीशी आमच्या
आम्ही काही एकटे नाहीत
आमच्या अभंगतेच्या कथा
तुम्हास कलुन चुकल्या आहेत
झाडल्या गोल्या ,फोडले बोंम्ब
तय आमच्यासाठी टिकल्या आहेत
हा गैरसमज कडून टाका
तुम्ही आम्हाला गुलाम करणार!!
तुम्हीच "भारत माता की जय" म्हाणित
तिरंग्याला सलाम करणार!!
जय भारत…….. जय महाराष्ट्र……
हम सब एक है
Sleeping with the enemy
3 weeks ago
2 comments:
प्रिय च्या जागी अप्रिय पाहिजे ...............
ही कविता माझी आहे.खाली नाव टाका.
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
Post a Comment