Tuesday, November 24, 2009

सेर सिवराज है

इंद्र जिमी जम्भ पर बाड्व सुअम्ब पर
रावण सदम्भ पर रघुकुलराज है ||१||
पौन बरिवाह पर | संभु रतिनाह पर |
ज्यो सहसबाह पर | राम द्विजराज है ||२||
दावा द्रुम दंड पर | चिता मृग झुंड पर |
भूषण बितुंड पर | जैसे मृगराज है ||३||
तेजतमअंस पर | कान्ह जिमी कंस पर |
त्यों म्लेंछ बंस पर| सेर सिवराज है ||४||

-कविराज भूषण

जंभासुरला जसा इंद्र , समुद्राला जसा वाडवाग्नी,
गर्विष्ठ रावणाला ज्याप्रमाणे प्रभुराम, मेघाला ज्याप्रमाणे वादळ,
मदनाला जसे शिव शंकर, सहस्रार्जुनाला ज्याप्रमाणे परशुराम,
वृक्षाना ज्याप्रमाणे वणवा, हरिणांना जसा चीत्ता,
अंधाराला जसा प्रकाश, कंसाला ज्याप्रमाणे श्रीकृष्ण,
त्याचप्रमाणे नरसिंह असणारे शिवराय म्लेंच्छांचा नाश करतात.

Friday, October 9, 2009

एक नॉस्तॅल्जिया आमचाही...

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5103364.cms

नाशिक टाइम्स' हातात पडल्यानंतर सवयीप्रमाणे शिवाजी तुपे यांनी लिहिलेला नॉस्तॅल्जिया वाचायला घेतला. क्षणभर वाटलं आपणही नॉस्तॅल्जिया लिहिला तर? वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वषीर्च निवृत्तीचे वेध लागले का, असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. पण आजची 'जनरेशन नेक्स्ट' आणि पूूवीर्ची जनरेशन यांच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे.

कालपरवापर्यंत एसटीडीचे रेट कमी होतील म्हणून रात्री दहा वाजल्यानंतर टेलिफोन बुथमध्ये जाणारे आपण आज सर्रास मोबाईलशी खेळ खेळू लागलो आहोत. पेजर नावाचं उपकरण कधी बाजारात आलं आणि गेलं कळलंदेखील नाही. पत्रलेखन शेवटचं कधी केलं हे सुद्धा आठवेणासं झालं आहे. म्हणूनच तर हा 'नॉस्तॅल्जिया'.

आमच्या लहानपणी रामायण-महाभारत सांगणारे आजी-आजोबा नव्हते. कारण घरातली सगळी मंडळी रामानंद सागर आणि बी. आर. चोप्रा जे छोट्या पडद्यावर दाखवतील ते पाहण्यात रममाण असायची आणि आम्ही त्या कलाकारांचे अनुकरण करत ओस पडलेल्या रस्त्यांवर तिरंदाजी करत असायचो. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींचा मृत्यू असो किंवा किल्लारीचा भुकंप, यापेक्षा वेगळ्या ब्रेकींग न्यूज पाहिल्याचं आठवत नाही.

१९९३ साली शाळेला अचानक सुट्ट्या का मिळाल्या हे समजण्यासारखं ते वय नव्हतं. शाळेच्या आवारात एकच इंग्रजी माध्यमाचा वर्ग असायचा आणि फक्त त्यांच्यासाठीच बेंचेस असल्याने थोडीशी असुया वाटायचीच. (नवनिर्माणाचं वारं त्याकाळी वाहन नव्हतं, नाहीतर आम्हीसुद्धा सतरंज्याचा त्याग केला असता)

चंदकांता मधला कुरसिंग, जंगल बुक मधला शेरखान, अलिफ लैला मधले राक्षस या सर्वांची दहशत लहान वयात थोडीफार वाटायचीच. डकटेल्समधला अंकल स्कूज पाहण्यासाठी लवकर उठावं लागायचं. कारण कार्टुन पाहण्यासाठी पोगो, हंगामा, कार्टुन नेटवर्क एवढी २४ तास सेवा त्याकाळी नव्हती. यथावकाश माध्यमक्रांती झाली, ग्लोबलायजेशनची सुरुवात झाली आणि मग पाहता पाहता काळ झटकन निघून गेला.

शाळेत जाणाऱ्या श्रेया घोषाल, सुनिधी चौहानच्या जागेवर आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन दिसू लागल्या. सुरभीच्या पत्रांच्या जागी एसएमएसचे डोंगर दिसू लागले. चॅनेल्सच्या गदारोळात 'सॉरी शक्तीमान' म्हणण्याची निरागसता निघून गेली. कुलु-मनालीच्या रस्त्यावर गाणं गाणाऱ्या आपल्या चित्रपट नायकांची भरारी सातत्याने इंग्लंड-अमेरिकेच्या रस्त्यांवरच दिसू लागली.

जेव्हापासून क्रिकेट समजायला लागलं, तेव्हापासून डोळ्यांसमोर दिसणाऱ्या सचिन तेंडूलकरनेसुद्धा कारकिदीर्ची दोन दशकं पार केली. सौरव गांगुली, अनिल कुंबळे तर एक कालखंड गाजवून निवृत्तसुद्धा झाले. डेव्हीड जॉन्सन, अॅबी कुरुविला या गोलंदाजांसाठी चॅरिटी मॅचेससुद्धा सुरू झाल्या.

स्टेफी ग्राफ-मोनिका सेलेस, आंदे आगासी-पीट सॅम्प्रस यांच्यातील थरारक लढती पाहता पाहता फेररर-नदाल, सेरेना-व्हिनसपर्यंत कधी येऊन पोहोचलो, समजलेच नाही.

आथिर्क उदारीकरणाची प्रक्रिया सुरू झाली, त्याकाळात टीव्हीवर सातत्याने अर्थमंत्री मनमोहनसिंग दिसायचे. हे दाढीवाले बाबा काय वाचतात ते लहानपणी समजलं नव्हतं. आज कॉलेजमध्ये कॅम्पस रिक्रुटमेंटसाठी मोठमोठ्या कंपन्या येऊ लागल्या. रिसेशन, बजेटसारखे शब्द कानावर पडू लागले, तेव्हा त्यातला 'अर्थ' समजू लागला.

मनमोहनसिंग आता पंतप्रधान झाले आहेत. र्वल्ड ट्रेड सेंटरच्या दुर्घटनेलाही आठ वर्षं होत आली आहेत. ज्या आमीर खान, अनिल कपुरचे चित्रपट पाहण्यासाठी लहानपणी रांगेत उभं रहावं लागायचं, त्यांच्याच मुला-मुलींच्या चित्रपटांसाठी आता कॉलेजला बंक मारावा लागतो आहे. खरच काळ किती बदललाय ना?

आज घरांतल्या सचिन तेंडूलकरच्या जुन्या पोस्टरवर धोनीचं पोस्टर दिसू लागलं आहे. बालचित्रवाणीऐवजी लहान मुलं 'बालिका वधू' पाहत असतात. 'किलबिल किलबिल पक्षी बोलती...' या गाण्याऐवजी 'ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार' म्हटलं जातंय. त्यामुळे मन नॉस्तॅल्जिक होतं आणि मोबाईलमध्ये सेव केलेलं गाणं परत परत ऐकावसं वाटतं. गाण्याचे बोल असतात, 'जंगल जंगल बात चली है, पता चला है. चड्डी पहनके फुल खिला है फुल खिला है!'

Saturday, September 19, 2009

यालाच जगणं अस म्हणायच...!!

..यालाच जगणं अस म्हणायच ?..
दुखाच्या उन्हात घाम गाळायचा ,
रात्री दुखाच्या अंधारातच रडायचे ,
त्यातच एखादी सुखाच्या थंड वाऱ्याची झुळूक आली
की तिचा फक्त गारवा मनात साठून ठेवायचा ,
पुन्हा दुखाच्या गारव्याने मनाला थंड वाटुन घ्यायच….
यालाच जगणं अस म्हणायच ???

एखाद स्वप्न बघायचं ,
ते पूर्ण करायला धड्पड़ायचं ,
अशातच स्वप्न तुटल की थोड्स रडायच ,
आणि पुन्हा नविन स्वप्ना मागे धवायाच ,
यालाच जगण अस म्हणायच ???

कोणाच्या तरी प्रेमात पडायच ,
लपून छ्पून भेटायच ,
एकाने रुसायच … दुसर्याने हसवायच ,
कुठल्यातरी Miss Understanding मुळे वेगळं व्हायच ,
मनात त्याचीच आठवण ठेउन पुन्हा दुसर्या प्रेमाच्या शोधात लागायच ,
यालाच जगण अस म्हणायच ???

लहान असताना आई वडीलांसाठी शिकायच ,
शाळेच्या शेवटी चांगल College भेटावा म्हणुन शिकायच ,
नंतर चांगल Future , Job , Life Partner भेटायला शिकायच ,
लग्ना नंतरही Family साठी , Promotion साठी शिकायच ,
त्यातच आपल्या आणि इतरांच्या अनुभवातून सुद्धा शिकायच ,
यालाच जगण अस म्हणायच ???

हसायच ….., रुसायच …..,
रागवायच ….., रडायच ……..,
काही वेळाने सगळं विसरून पुन्हा हसायचं ,
यालाच जगण अस म्हणायच ??

Wednesday, July 15, 2009

जमलंच नाही ..!

आपल्यालाही आवडलं असतं...
रोज संध्याकाळी तिला चौपाटीवर फिरवायला,
तिच्या निळ्या डोळ्यांत स्वतःला हरवायला,
वाळूत बंगला बांधता बांधता..
आलं असतं मनातलं सांगता..

पण जाऊदे जमलंच नाही ..!

आपल्यालाही आवडलं असतं..
कधीतरी तिच्यासोबत बागेमध्ये जायला,
एकच कॅडबरी दोघांमधे वाटून खायला,
कधी खोडी काढली असती..
आणखी गोडी वाढली असती..

पण जाऊदे जमलंच नाही ..!

आपल्यालाही आवडलं असतं...
तिचा हात हळुवारपणे आपल्या हातात घ्यायला,
लता-रफ़ी, किशोर-आशा ड्युएट गाणं गायला,
सूर कदाचित जुळले असते..
तिला मनातले कळले असते..

पण जाऊदे जमलंच नाही ..!

आपल्यालाही आवडलं असतं...
निघताच निघता तिला बावरलेलं पाहायला,
मला तिची,तिला माझी शपथ वाहायला,
माझे अश्रू माझ्या डोळ्यांत लपले असते.
तिचे मात्र दवासारखे जपले असते...

पण जाऊदे जमलंच नाही.....

पुण्याची सवय झाली

पुण्याची सवय झाली

जे खरे ते लपवण्याची सवय झाली,
या तुझ्या शहरी, जिण्याची सवय झाली!

पुस्तके ना वाचली, ना वृत्तपत्रे
रोज 'पाट्या' वाचण्याची सवय झाली

हो! मलाही लागले पाणी पुण्याचे
काय सांगू? भांडण्याची सवय झाली

कीस शब्दांचाच नुसता पाडताना
मूळ मुद्दा चुकवण्याची सवय झाली

भांडल्याविन जात नाही दिवस माझा
वाटते आता पुण्याची सवय झाली

Sunday, July 5, 2009

एक पत्र... भाईसाठी

पुलं गेल्यानंतर आलेल्या त्यांच्या वाढदिवशी सुनीताबाईंनी जागवलेल्या या पुलंच्या आठवणी... ‘ महाराष्ट्र टाइम्स ’
च्या १२ नोव्हेंबर २००च्या अंकातून पुनर्प्रकाशित.
................................

..तुला सार्वजनिक ' आपण ' प्रिय , तर वैयक्तिक ' मी ' ची ताकद ज्याने त्याने आजमावायला हवी हा मा‌‌‍‍झा अट्टाहास. ही ताकद तुझ्यात प्रचंड प्रमाणात आहे , याचा प्रत्यय मला सतत येत राही , तर नेमकं त्याच गोष्टीचं विस्मरण तुला सतत होत राही. अशा अनेक बाबतीत तू आणि मी एकमेकांपासून ख़ुप दूर होतो. जणू ' दोन धृवांवर दोघे आपण '. सदैव माणसात रमणारा तू , तर माणसांपेक्षा मानवतेवर जीवसृष्टी वनस्पतीसृष्टी मला अधिक प्रिय.
तूही जर इतर चारचौघांसारख़ाच ' एख़ादा कुणी ' असतास ना , तर मग निर्मितीची , साहित्य-संगीतादी कलागुणांची कितीही श्रीमंती तुझ्यापाशी असती , तरी मी त्या कशानेही आकर्षिले गेले नसते , हीच शक्यता अधिक आहे. मला भावली ती तुझ्यातली निरागसता. तुझा ' मुल ' पणा. तुझी लबाडीही पटकन उघड व्हायची. कोणत्याही गोष्टीचा विचार करावा , त्यात तरबेज व्हावं , त्यासाठी मेहनत करावी , हे तुझ्या स्वभावातच नव्हतं. व्याख़्यानांत , लिख़ाणात , तू असल्या गुणांची प्रशंसा करायचास. पण प्रत्यक्षात त्यापेक्षा गप्पा माराव्या , लोळत पडावं , गाणं ऐकावं , फार तर पुस्तकं वाचावी , चाळावी हे तुला अधिक प्रिय. निर्मितीक्षम कलाकाराची साधना सतत डोक्यातच कुठेतरी मूकपणे चालूच असते का ?

कवी ग्रेसच्या ओळी आहेत , ' क्षितीज जसे दिसते , तशी म्हणावी गाणी। देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी ॥ गाय जशी हंबरते , तसेच व्याकुळ व्हावे । बुडता बुडता सांजप्रवाही , अलगद भरुनी यावे ' . तुझं व्यक्तिमत्व असं विचारपूर्वक संस्कारीत होत गेलेलं नव्हतं. तू पिंडाचाच सुसंस्कृत होतास. जन्मजात कलावंत होतास , तसाच विचारवंही जन्मजातच होतास. ती तुझी श्रीमंतीही होती आणि मर्यादाही होती. आपली संस्कृतीच पुरुषप्रधान आहे , त्याच पाळामुळातून तुझं पोषण होत गेलं आणि अंगभूत कृतज्ञताबुध्दीने आपल्या परीने तीच संस्कृती तू जपलीस.

ती तुझी सहज प्रवृत्तीच होती , प्रकृती होती. मराठी ' विश्वकोषा ' त किंवा ' हूज हू ' मध्ये तुझ्या नावाची नोंद कलावंत म्हणून होईल. तशीच ' विचारवंत ' हे ही विशेषण तुझ्यामागे लावलं जाईल. पण आपण उभयतांच्या जीवनकोशात माझ्यासमोर ठाकलास तो त्या पुरुषप्रधान संस्कृतीचा आधारस्तंभच जसा! प्रज्ञेअभावी नवे , तर निव्वळ आळसापोटी तू विचार करण्याचं टाळत आलास. जे सहज आयते मिळतात , त्यासाठी बुद्धी कशाला शिणवावी ? मनात विचार घोळवण्यापेक्षा सूर घोळवणं हे केव्हाही अधिक आनंददायी , स्वत:लाही आणि भोवतालच्यांनाही. ही लबाडी म्हण किंवा पळवाट म्हण , मला कळायची पण त्याची तुला चिंता नव्हती. मी का कोणी परकी होते ? हक्काची बायकोच ना तुझी !

तुझ्यासाठी मी काय केलं ? तुझ्या तहानभूकेचं वेळापत्रक सांभाळलं , माझ्या परिने नवी-जुनी खेळणी पुरवली , अंगण सारवून स्वच्छ ठेवत गेले त्यात फ़ारतर क्वचित कधी एखादं स्वस्तिक रेखलं. चित्रांची रांगोळी काढायला मला येतच कुठे होती ? कलावंत ' तू ' होतास. शब्द कळेची गर्भश्रीमंतीही , ' तुला ' लाभली होती. येतांना कंठात आणि बोटात सूर घेऊनच तू जणू जन्माला आलास. अंतर्बाह्य आनंद सोबतीला आणलास. तू गेलास तरी तुझा तो दिर्घायुषी सोबती अजून बराच काळ मागे रहाणार आहे.

तू गेलास उद्या मीही नाहीशी होणार पण आपल्या मायबोलीचा एक कंठमणी झालेला तुझा शब्द मराठी भाषा जिवंत असेपर्यंत स्वत:च्या तेजाने चमकतच राहील ना ?

थोडीथोडकी नव्हे अखंड ५४ वर्षांची ही वाटचाल. प्रवास म्हटला की , सहाजिकच चढ उतार आले. पण आज या घटकेला कशाचाही शीण जाणवत नाही. थकवा येतो तो सतत येत रहाणाऱ्या या आठवणींचा. थकल्याभागल्या मनावर असं अधिपत्य गाजवू नये , एवढाही पोच त्यांना नसतो. तू या सगळ्यातून सुटलास. माझ्या मनाच्या एका बंदिस्त कोपऱ्यात कायम वास्तव्याला आलास. शांतपणे इतर सर्वांच्या नकळत माझ्या सोबतीला येऊन राहिलास. जसा खळखळ पण निर्धास्त जगलास , तसाच निर्धास्तपणे चिरकाल विसाव्याला येऊन राहिलास.

मला तरी आता करण्यासारखं राहिलंच आहे काय ? तसा व्याप खूप आहे पसारा बराच आवरायचा आहे. तुझ्या दोन-तीन नव्या पुस्तकांचं कामही व्हायचं आहे. म्हटलं तर काम भरपूर आहे , पण ते ओझं मीच डोक्यावर घेतलं पाहिजे , असं थोडंच आहे ? मदतीला धावून येणारे खूप स्नेही सोबती आहेत. सगळं निभावून न्यायला ते समर्थ आहेत. मी स्वत: काय त्यांच्या मदतीने काय आणि उरलेलं सारं काही त्यांच्यावरच सोपवून काय हळूहळू सगळं काम पुरं होईल आणि त्यातलं काहीही झालं नाही तरी कितीसा फरक पडणार आहे ? या संदर्भात सत्य एकच आहे , ते म्हणजे या घरांत खेळण्याऱ्या हवेतून श्वास घ्यायला माझ्या जोडीला आता तू नसणार.
अशा वेळी काय करावं ?
(मंगेश पाडगांवकरांचं नाव घेऊन)
सुकलेल्या झाडाला न बोलता पाणी घालवं इतकंच.

-सुनीता देशपांडे

Monday, June 8, 2009

Why Do I Still Love You ?

I Cant Get You out of My head
No Matter how i try
I Still love You
Even when you make me Cry,

I want You in my Arms
I want you to be Mine
But You don't want me Now
You says it's Not our Time,

Relationships are hard Enough
But love makes them even Worse
Love Makes it hard to give Up
Love is a curse,

I Hate the fact I love You
And that i cant Get You out of My Mind
I hate that every time i think of You
My heart flutters and My eyes Cry,

I don't understand how you do this to Me
How You make Me want to Die
How I dream about you Every Night,

I 'd rather Cry and mope and Whine
Than call You to get things Straight
Because somewhere in my Heart
I know Its already Too Late ..

Wednesday, April 29, 2009

"ती" संध्याकाळ

वा-याने गंधांचे थवे फ़ुलले
पक्ष्यांची शाळा भरली
संध्याकाळ बासरीने गुणगुणली
मला ती येण्याची चाहूल लागली

पाणी बेभान थिरकले
डोंगर संधीप्रकाशाने उजळले
दिवसाची घालमेल थबकली
मला ती येण्याची चाहूल लागली

सृष्टी चैतन्यात चिमुकली झाली
अंबरात सांज ऊतू गेली
पायवाटांत ओढ भिरभिरली
मला ती येण्याची चाहूल लागली

मेघ रेशमी गारव्याच्या अंथरुणात उतरले
डोळे संध्येच्या पंखांनी झाकले
अरुणाने रात्रीला हाक दिली
मला ती येण्याची चाहूल लागली

पराग रिसबुड
Source - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3368585.cms

Tuesday, February 10, 2009

एक पिस्तुलाची गोळी - अनिल अवचट

एक पिस्तुलाची गोळी
अर्धा इंच लांब जेमतेम
तर पाऊण धरा
ते घोडा दाबणारं बोट
फक्त थोडं मागं घ्यायचं
असंच, फार तर पाव इंच
की निघालीच ती गोळी
मोठा आवाज करत, सुसाटत
भेदलाच तिने तो
छातीचा कृश पिंजरा
कोसळलंच ते
उपोषणं करून करून
झिजलेलं म्हातारं शरीर
आडवेच झाले
ते चालून चालून
थकलेले पाय
निमालं अखेर
अमानुष जातीय दंग्यांनी
विद्ध झालेलं मनही
वा रे वा,
त्या पिस्तुलाची कमाल
ती गोळी, अर्धा इंच जेमतेम
आणि ते घोडा दाबणारं
मानवी बोट
हे राम!

-अनिल अवचट, पुणे.
Source - http://beta.esakal.com/2009/01/29212251/bullet-and-gandhiji.html